शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

मळी वाहतूक परवान्यासाठी टनाला ५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:46 IST

कोपार्डे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई मळी नियम १९५५ अंतर्गत नियम १३(१)१५(१)व १९(१)मध्ये केलेल्या सुधारणांचे परिपत्रक सर्वच साखर कारखान्यांना पाठवण्यात आले असून, यामध्ये मळी वाहतूक परवाना शुल्क (ट्रान्स्पोर्ट परमिशन) म्हणून आकारण्यात येणारे प्रतिटन एक रुपया शुल्क तब्बल पाचशे पट वाढवून प्रतिटन ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून या ...

कोपार्डे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई मळी नियम १९५५ अंतर्गत नियम १३(१)१५(१)व १९(१)मध्ये केलेल्या सुधारणांचे परिपत्रक सर्वच साखर कारखान्यांना पाठवण्यात आले असून, यामध्ये मळी वाहतूक परवाना शुल्क (ट्रान्स्पोर्ट परमिशन) म्हणून आकारण्यात येणारे प्रतिटन एक रुपया शुल्क तब्बल पाचशे पट वाढवून प्रतिटन ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून या सुधारित परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या फतव्याने साखर कारखानदारांत खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. पैकी २१ कारखान्यांकडून दोन, सव्वा दोन लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात येते. या गाळपातून साखरेबरोबरच उपउत्पादन मळी निर्माण होते. एक टन ऊसगाळपापासून सर्वसाधारण १२ टक्के सरासरी उताºयाप्रमाणे १२० किलो साखर तर ४ टक्के म्हणजे ४० किलो मळी (मोलॅसिस) निर्माण होते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून दोन सव्वा दोन कोटी उसाचे गाळप होते.यातून ४ टक्के मळीला मिळणाºया सरासरी उताºयाप्रमाणे आठ ते नऊ लाख टन मळीची निर्मिती होते. या मळीच्या वाहतूक परवानगीसाठी शुल्क आकारले जाते. ते प्रतिटन एक रुपया होते. यात सुधारणा करत मुंबई मळी नियम १९५५ अंतर्गत नियम १९(१)मधील नमुना एस-६ मळी वाहतुकीच्या परवानगीकरिता प्रति मे.टन ५०० रुपये शुल्क आकारण्यात यावे.तसेच आयात व निर्यात होणाºया मळीची वाहतूक करताना ५०० रुपये प्रति मे.टन इतके अतिरिक्त वाहतूक शुल्क (नमुना ए-६) आकरण्यात यावे. ही अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली असली तरी या अगोदर मळीच्या आयात निर्यातीला परवानगी दिलेली असेल आणि उचल १ नोव्हेंबरपासून सुरु केली असली तरी प्रतिटन वाहतूक शुल्क ५०० रुपये भरावे लागणार आहेत.जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून निर्माण होणाºया आठ लाख टन मळीसाठी पूर्वी एक रुपयाप्रमाणे ५-८ लाख रुपये वाहतूक परवाना शुल्क भरावे लागत होते. आता नवीन सुधारित परिपत्रकाप्रमाणे हे शुल्क ५०० रुपये केल्याने ४० कोटी रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे कारखानदारांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.व्हँटचे उत्पन्न भरून काढण्यासाठी शासनाचा फंडा१ जीएसटी पूर्वी केंद्र शासनाला एक्साईज ड्युटी तर राज्य सरकारला २० टक्के व्हॅट मिळत होता. जर ५ हजार प्रतिटन मळीचा दर असेल तर २० टक्के प्रमाणे ११५० रुपये राज्य सरकारला मिळत होते.२ पण जीएसटी आल्यानंतर व्हॅट बंद झाला असून २८ टक्के जीएसटीप्रमाणे होणारा १४०० रुपये करापैकी ५० टक्के राज्य शासनाच्या हिश्श्याप्रमाणे ७०० रुपये मिळाले तरी व्हॅटपेक्षा ४५० रुपये कमी मिळतात.३ हे बुडणारे उत्पन्न भरून काढण्यासाठीच मळी वाहतूक परवाना शुल्कात वाढ करून बडगा उगारल्याचे या उद्योगातील एका तज्ञाने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :agricultureशेती